रुपाली आज घाईत होती. भाऊबीजेसाठी तिनं आरतीचं ताट सजवलं होतं, जुन्या चांदीच्या निरंजनांत तिनं तूप घातलं, सैपाकघरात देव्हाऱ्यासमोरच्या बाजूला पाट मांडून सुंदर रांगोळी काढली. नंतर प्रतिकला त्या पाटावर बसवून त्याला ओवाळलं. ओवाळणी म्हणून प्रतीकनं वडिलांकडून घेतलेले पन्नास रुपये दिले. ओवळताना त्याची चेष्टामस्करी चालूच होती.
"मी तुला लाडू देणार नाही"
"पन्नास रुपयात लाडू देऊ व्हय तुला"
"दे गं दिदे, आतापूरतं दे, पुढच्या वर्षी हजार देतो"
"हे बाबा घे! लई आलाय हजार देणारा"
"द्यायलाच लागणार! कारण तू जाणार ना इथून"
"लई शहाणा हैस, गप्प खा लाडू"
रामाण्णा तिथंच बसून हे सगळं बघत होता. पण काहीच बोलत नव्हता. त्याच्या मनात कायतरी वेगळंच चालू होतं. चार दिवसांपूर्वीच बँकेची नोटीस आली होती. त्यादिवशीपासून हा असाच शांत-शांत होता.
एकेकाळी आख्या गावात त्याचा दरारा होता. त्याचं खरं नाव रामगोंडा पाटील. त्याचे वडील शिवगोंड पाटील! या शिवाप्पानं व्यसनापायी शेती घालवली. जी काय दोनतीन एकर शिल्लक जमीन होती त्यात कष्ट करून रामाण्णा बायको-पोरं आणि म्हाताऱ्या बापाला सांभाळत होता.
सगळं काही नीट चालू होतं. पण गेल्या चार वर्षात त्याची परिस्थिती खूपच बिकट झाली होती. काहीकेल्या कर्ज फिटत नव्हतं. दोन वर्षं पुरात पीक वाहून गेलं आणि दोन वर्षं दुष्काळात करपून गेलं. पण बँकेला त्याचं काय सुखदुःख? थोडंफार जे ऊसाचं पैसं यायचं ते सोसायची कट करून घ्यायची, वरचं काही हातात यायचं ते चटणीमिठाला संपायचं. त्यात लेकीचं लग्न तोंडावर होतं. त्या खर्चाचं टेन्शन पण होतंच त्याच्या उरावर.
हे सगळं टेन्शन लपवून तो लेकरांचं हसणं-खिदळणं बघत बसला होता. अचानक त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक? मालकीणीनं दिलेला चहा अर्धाच सोडून तो उठला आणि तिला म्हणाला "जातो गं जरा रानात चाललोय."
"आवं च्या तर प्या की सगळा."
"राहूदे सोड, अर्धा....."
एवढं म्हणून तो शेतात गेला. थोडा वेळ त्यानं इकडंतिकडं केलं. काही वेळानं तो शेजारच्या चौगुल्याच्या तळावर गेला. तिथं नेमा चौगुल्याचा अभि होता. तो गोठ्यात जनावरं धूत होता.
रामण्णाला तिथं बघितल्यावर तो हातातलं काम सोडून त्याच्याकडं आला. आणि त्यानं विचारलं "आण्णा दिवाळी कशी गेली?"
"गेली बाबा, आली तशी गेली." "अबु! ते जरा 18 चा पाना असला तर दे"
"का ओ आण्णा?"
"चेंबर चालू करायचा हाय रे, जरा तण वाढलंय फवारणी करतो की, राऊंडअप आणलंय."
"पण पंप कुटं हाय ओ?"
"हाय रं रानात हाय तू दे लवकर"
एवढं बोलून रामाण्णा तिथून निघाला. तासाभराने तो परत आला. अभिला त्याचा पाना परत दिला. आणि म्हणाला "अबू, जरा पाणी देतोस काय रं? घसा कोरडा पडलाय."
अभि आतून पाणी घेऊन आला, त्याला तो पाणी देणार इतक्यात रामाण्णा कोसळला.
अभिला कळायचंच बंद झालं! रामाण्णाच्या तोंडातून फेस येत होता. त्यानं राउंडअप तणावर मारलं नव्हतं.
अभिनं त्याच्या वडिलांना व काही मित्रांना फोन केला. त्याला त्यांनी दवाखान्यात नेलं. घरात बातमी कळली. सकाळी हसलेल्या घरात आता रडायला पण कुणी नव्हतं; सगळेच दवाखान्यात पोचले.
बघता बघता बातमी गावभर पसरली. गावात चर्चेला एक विषय लागतो ना! आयता विषय मिळाला होता रिकामटेकड्यांना. उलटसुलट चर्चा सुरु झाल्या, काहींनी तर त्याच्या चारीत्र्यावरपण शिंतोडे उडवले. पण त्यांच्या तोंडाला कोण हात लावणार?
अथक प्रयत्नांनी रामाण्णा वाचला, बायकोनं मंगळसूत्र गहाण ठेऊन दवाखाण्याचं बिल भरलं.
संध्याकाळी शुद्धीवर आल्यावर रामाण्णा दोन्ही लेकरांना मिठीत घेऊन ढसाढसा रडला…
आज रामाण्णा वाचला नसता तर तो एकटा सुटला असता पण कुटुंबाचं काय झालं असतं?
अयोध्येतील रामाची उंची १५० मीटर की २०० मीटर? या प्रश्नाचं उत्तर आज त्याच्यासमोर गौण आहे. त्याच्यावर ही वेळ का आली? हा खरा प्रश्न आहे.
रुपाली, प्रतीक, त्याची बायको, त्याचा बाप हे सर्वजण आज आनंदाश्रू ढाळत आहेत, कारण त्यांचा डोंगराएवढा राम मृत्यूच्या दाढेतून परत आलाय ना!
©सुरज मडके
"मी तुला लाडू देणार नाही"
"पन्नास रुपयात लाडू देऊ व्हय तुला"
"दे गं दिदे, आतापूरतं दे, पुढच्या वर्षी हजार देतो"
"हे बाबा घे! लई आलाय हजार देणारा"
"द्यायलाच लागणार! कारण तू जाणार ना इथून"
"लई शहाणा हैस, गप्प खा लाडू"
रामाण्णा तिथंच बसून हे सगळं बघत होता. पण काहीच बोलत नव्हता. त्याच्या मनात कायतरी वेगळंच चालू होतं. चार दिवसांपूर्वीच बँकेची नोटीस आली होती. त्यादिवशीपासून हा असाच शांत-शांत होता.
एकेकाळी आख्या गावात त्याचा दरारा होता. त्याचं खरं नाव रामगोंडा पाटील. त्याचे वडील शिवगोंड पाटील! या शिवाप्पानं व्यसनापायी शेती घालवली. जी काय दोनतीन एकर शिल्लक जमीन होती त्यात कष्ट करून रामाण्णा बायको-पोरं आणि म्हाताऱ्या बापाला सांभाळत होता.
सगळं काही नीट चालू होतं. पण गेल्या चार वर्षात त्याची परिस्थिती खूपच बिकट झाली होती. काहीकेल्या कर्ज फिटत नव्हतं. दोन वर्षं पुरात पीक वाहून गेलं आणि दोन वर्षं दुष्काळात करपून गेलं. पण बँकेला त्याचं काय सुखदुःख? थोडंफार जे ऊसाचं पैसं यायचं ते सोसायची कट करून घ्यायची, वरचं काही हातात यायचं ते चटणीमिठाला संपायचं. त्यात लेकीचं लग्न तोंडावर होतं. त्या खर्चाचं टेन्शन पण होतंच त्याच्या उरावर.
हे सगळं टेन्शन लपवून तो लेकरांचं हसणं-खिदळणं बघत बसला होता. अचानक त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक? मालकीणीनं दिलेला चहा अर्धाच सोडून तो उठला आणि तिला म्हणाला "जातो गं जरा रानात चाललोय."
"आवं च्या तर प्या की सगळा."
"राहूदे सोड, अर्धा....."
एवढं म्हणून तो शेतात गेला. थोडा वेळ त्यानं इकडंतिकडं केलं. काही वेळानं तो शेजारच्या चौगुल्याच्या तळावर गेला. तिथं नेमा चौगुल्याचा अभि होता. तो गोठ्यात जनावरं धूत होता.
रामण्णाला तिथं बघितल्यावर तो हातातलं काम सोडून त्याच्याकडं आला. आणि त्यानं विचारलं "आण्णा दिवाळी कशी गेली?"
"गेली बाबा, आली तशी गेली." "अबु! ते जरा 18 चा पाना असला तर दे"
"का ओ आण्णा?"
"चेंबर चालू करायचा हाय रे, जरा तण वाढलंय फवारणी करतो की, राऊंडअप आणलंय."
"पण पंप कुटं हाय ओ?"
"हाय रं रानात हाय तू दे लवकर"
एवढं बोलून रामाण्णा तिथून निघाला. तासाभराने तो परत आला. अभिला त्याचा पाना परत दिला. आणि म्हणाला "अबू, जरा पाणी देतोस काय रं? घसा कोरडा पडलाय."
अभि आतून पाणी घेऊन आला, त्याला तो पाणी देणार इतक्यात रामाण्णा कोसळला.
अभिला कळायचंच बंद झालं! रामाण्णाच्या तोंडातून फेस येत होता. त्यानं राउंडअप तणावर मारलं नव्हतं.
अभिनं त्याच्या वडिलांना व काही मित्रांना फोन केला. त्याला त्यांनी दवाखान्यात नेलं. घरात बातमी कळली. सकाळी हसलेल्या घरात आता रडायला पण कुणी नव्हतं; सगळेच दवाखान्यात पोचले.
बघता बघता बातमी गावभर पसरली. गावात चर्चेला एक विषय लागतो ना! आयता विषय मिळाला होता रिकामटेकड्यांना. उलटसुलट चर्चा सुरु झाल्या, काहींनी तर त्याच्या चारीत्र्यावरपण शिंतोडे उडवले. पण त्यांच्या तोंडाला कोण हात लावणार?
अथक प्रयत्नांनी रामाण्णा वाचला, बायकोनं मंगळसूत्र गहाण ठेऊन दवाखाण्याचं बिल भरलं.
संध्याकाळी शुद्धीवर आल्यावर रामाण्णा दोन्ही लेकरांना मिठीत घेऊन ढसाढसा रडला…
आज रामाण्णा वाचला नसता तर तो एकटा सुटला असता पण कुटुंबाचं काय झालं असतं?
अयोध्येतील रामाची उंची १५० मीटर की २०० मीटर? या प्रश्नाचं उत्तर आज त्याच्यासमोर गौण आहे. त्याच्यावर ही वेळ का आली? हा खरा प्रश्न आहे.
रुपाली, प्रतीक, त्याची बायको, त्याचा बाप हे सर्वजण आज आनंदाश्रू ढाळत आहेत, कारण त्यांचा डोंगराएवढा राम मृत्यूच्या दाढेतून परत आलाय ना!
©सुरज मडके
Nice... 👌
ReplyDeleteNice story
ReplyDeleteMst sir....
ReplyDeletePudhe kay jal.
ReplyDeleteKhup vait parastiti ahe
DeleteApalya deshyat ajunhi as hot
साऱ्या जगासमोर पंचपक्कवणाच ताट वाढणारा, साऱ्या जगाचा पोशिंदा, बळीराजा आता स्वतःच दोन्ही वेळच्या अन्नासाठी तळमळतो आहे
ReplyDeleteSuperb suraj
ReplyDelete